Sunday, September 14, 2008

गणपती बाप्पा मोरया...!

आज अनंत चतुर्दशी...
गणपती बाप्पा निघाले आता पुढील प्रवासाला...
उपत्ती...स्थिती ....आणि लय...हे परमेश्वरी कार्याचे चक्र आहे..हे अनंत चतुर्दशी दर्शविते..खरतर आपण गणेशाची प्राण प्रतिष्ठा करतो...पण पुढील ११ व्या दिवशी त्याचे आपण विर्सजन करतो..पण आपण या घटनेतुन हा बोध घ्यायचा आहे की मानवी जीवन हे सुध्दा क्षणभंगुर आहे..आपण या सृष्टीत जन्म घेतो आणि एके दिवशी आपणही पुढच्या प्रवासाला निघतो ..म्हणुन माणसाने आपल्या आयूष्यात सदैव सत्कार्य करत रहावे ...ते सुध्दा परमेश्वरी नाम घेऊन...!
कुडंलीत पहिले स्थान हे उप्पत्ती दाखवते म्हणजे जीवनाचे स्विच आँन होते....तसेच १२ वे स्थान हे जीवनाचा लय दाखवते म्हणजेच जीवनाचे स्विच आँफ़ होते...

हायर एज्यूकेशन इन फ़ाँरेन कन्ट्रीज.....! Higher Education In Foreign Countries.....






प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे येतच असते. शिक्षणामुळे माणुस शिक्षित होतो. ४-आणि११ स्थानांमुळे शालेय व काँलेज शिक्षण दाखवले जाते.नवम स्थान हे उच्च शिक्षण दाखवते.नवम स्थानाच्या कार्येशाच्या दशेमध्ये किंवा अंतर दशेमध्ये जातक उच्च शिक्षण घेत असतो.परदेशा मध्ये निवास हा १२ व्या स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी दाखवितो.१२ व्या स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी हा जर ३किंवा ९ स्थानाचा कार्येश असतो तेव्हाच परदेश गमनाचा योग येतो.स्काँलरशिप साठी ६ व ११ स्थानांच्या कार्येशाचा विचार करावा. नोकरीसाठी ६ आणि १० स्थानाचा विचार करावा. वरील कुडंलित नवव्या स्थानाचा नक्षत्र स्वामी चंद्र असुन उप-नक्षत्र स्वामी शुक्र आहे. चंद्र हा तॄतियेश असुन स्वतःच्या नक्षत्रा मध्ये आणि उप-नक्षत्रा मध्ये आहे.तो मनाचा कल दाखवतो.नवमाचा उप-नक्षत्र स्वामी शुक्र असुन तो ११ व्या स्थानात स्थित असुन स्वतःच्या नक्षत्रा मध्ये आहे त्यामुळे तो ईच्छा पुर्ति व प्रयत्नां मध्ये यश दाखवितो त्याप्रमाणे जातकाला उच्च शिक्षण मिळाले आहे.शनि आणि मंगळ हे नवम स्थानाचे कार्येश आहेत त्यामुळे परदेश गमन व उच्च शिक्षण होते तसेच त्यांच्या अर्तंदशेत झालेले आहे.गुरु १२ व्या स्थानामध्ये असुन त्याच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही त्यामुळे तो १२ व्या स्थानाचा स्ट्राँग कार्येश झाला आहे त्यामुळे गुरु परेशात वास्तव्य दाखवितो त्यामुळे गुरु महादशा, शनि अंतरदशा व राहू विदशेत जातक परदेशात उच्च शिक्षणा साठी गेलेला आहे. हा कालावधी २४-०५-१९६९ साली होता.ज्योतिष अभ्यासू,व्यासंगी ,सूज्ञ वाचकांनी वरील अनुभव घ्यावा.

Wednesday, September 3, 2008

गणपती बाप्पा मोरया ...!







Swww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.ws

आपल्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..........!
धन्यवाद वाचक वर्ग हो ...! अबब आमच्या वाचक वर्गाची संख्या अगदी अल्पावधीत (५८९५)पाच हजार आठशे पंच्यांण्णव झाली आणि ती वाढतच आहे...
प्रत्येकाने आपल्या घरात श्रीगणेश अर्थात गणपतीची मुर्ती आणुन प्रतिष्ठापना केली असेलच.श्रीगणेश ही बुध्दिची देवता आहे म्हणुन आपण गणेश उत्सव साजरा करातांना या दहा दिवसात रोज सकाळ व सायंकाळ आरती नंतर गणपती अर्थवशीर्ष म्हणावे.अध्यात्माने हे सिध्द केले की अर्थवशीर्षाच्या स्पंदनाने ब्लड प्रेशर नाँर्मल स्थितीला आणता येते.
यज्ञ,विवाह,इत्यादी धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटणे सहाजिकच होते.गणेशाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्या ऎवजी आपल्या मात्या-पित्याला सात प्रदक्षिणा घातल्या व ब्रम्हदेवाने म्हटले की माता ही पृथ्वी समान आहे म्हणुन गणेशाला हा मान बुध्दिच्या बळावर मिळाला आहे.
गणपतीच‍ी विशेष कृपा लवकर प्राप्त करण्यासाठी श्वेत अर्काला पुष्य-नक्षत्रयुक्त रविवारच्या दिवशी आणुन पंचामृताने अभिषेक करा. गणपतीची लाकडाची मूर्ती बनवून तिला घराच्या प्रवेशद्वाराबाहेर ठेवल्यास घर मंगलमय लहरींनी पवित्र होते.
गणेश चतुर्थी - दिवसभर मुहूर्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (बुधवारी, ता. ३ सप्टेंबर) गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी सूर्योदयापासून सायंकाळी सातपर्यंत मुहूर्त आहेत. सूर्यास्तानंतर गणपतीची स्थापना शक्यतो करु नये.
शनिवारी (ता. ६) गौरी आवाहन (महालक्ष्मी) मुहूर्त सकाळी ७.२० ते ९.०० व दुपारी १ ते ३ या वेळेत करावे.

लक्षात ठेवा:
गणपती उत्सवात आपण रात्री १० वाजेनंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावे कारण छोटे मुले, जेष्ठनागारिक ,दवाखान्यातले रुग्ण यांना केवळ हिंदी कर्कश गाण्यांपासुन त्रास होण्याचा संभव आहे.
शक्यतो LED ची लायटींग करावी वीजेची बचत होईल..!
आपण गणेश आराधनेत त्याच्या दहा दिवसात त्याच्या बुध्दिरुपी स्वरुपात एकरुप व्हायचे आहे तेव्हा कृत्रिम ,अनावश्यक खर्च टाळा.
वर्गणीतले उरलेले पैसे एखाद्या गरीब किंवा आजा-याला दान करा. त्याचे आशीर्वाद घ्या ही परमेश्वराची भक्ति आहे हे लक्षात घ्या.
या सणाचा आनंद मनापासुन लुटा...अन म्हणा ...एक लाडू फ़ुटला...गणपती बाप्पा घरी विराजला..... !

Monday, September 1, 2008

रुलिंग प्लेनेट्स एक जादूची कांडी......!



गदी सायंकाळी मी काही कुडंल्याचा अभ्यास करत होतो. कुणी तरी दाराची कडी
वाजविली.मी दार उघडले....!कुणी तरी अनोळखी व्यक्ति घरात शिरली...? मी काही बोलायच्या आत ते म्हणाले आपण ज्योतिषी आहात अस मला माझ्या मित्राने सांगितले...तेव्हा तो सरळ मुद्यावर आला मी खुप चिंतातुर आहे वेळ न दवडता मी आपल्या कडे आलो आहे ...माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा परगावी सर्व्हीसला आहे तो रोज अप-डाऊअन करतो पण
तो आज घरी वेळेत परत आलेला नाही ...आपण माझा प्रश्न बघा....!प्रश्न पाहतांना १सप्टेंबर२००८ रोजीची ती वेळ होती रात्रीचे ०८:०४:०० pm वाजले होते मी त्यावेळेची प्रश्न कुडंली मांडली.प्रश्न कुडंलीत मीन लग्न येते त्यामुळे रुलिंग प्लँनेटस
मध्ये लग्नेश गुरु होता आणि चंद्र हा कन्या राशीत असुन उत्तरा नक्षत्रात आहे त्यामुळे रुलिंग प्लेनेट्स मध्ये रवि आणि बुध येतो.वार सोमवार असल्यामुळे रुलिंग प्लँनेट मध्ये चंद्र येतो.प्रश्न कुडंलीत चंद्र केद्रांत असल्यामुळे जातक लवकरच मीन लग्न संपण्याच्या आत पोहोचावयास पाहिजे परंतु पंचागानुसार मीन लग्न ०७:२३:०० रात्री सुरु होउन ०८:५९:०० संपते .आता रुलिंग प्लँनेट मध्ये गुरु महत्वाचा आहे त्याच प्रमाणे मीन राशी मध्ये रेवती नक्षत्र आहे त्यामुळे बुध घ्यावा लागेल तसेच वार सोमवार म्हणुन चंद्र घ्यावा लागेल परंतु चंद्राच्या रशीत केतू असल्याने रुलिंग प्लँनेट मध्ये चंद्रा ऎवजी केतूला घ्यावे लागेल
कारण कॄष्णमुर्ती म्हणतात Nodes are stronger than planets म्हणुन गुरु,बुध,केतू,रवि अशी रुलिंग प्लँनेटस ची साखळी घ्यावी लागेल.म्हणजे घटना घडतांना हे रुलिंग प्लँनेटस असावे लागतील आणि हा बिंदू १८ अंश उदीत असतांना ती व्यक्ति घरी परतावयास हवी.सदर लग्न हे ३मिनिटाला १ अंशातुन फ़िरते तर १८ अंश फ़िरायला १८x ३= ५४ मिनीटे जवळ जवळ लागतील.०७:२३:०० ला मीन लग्न सुरु झाले त्यात ००:५४:०० मिनिटे मिळविल्यास ०८:१७:०० वाजता रात्री ही घटना घडायला हवी म्हणजे ती व्यक्ति घरी यायला हवी.त्यांना म्हटले आता हे कँल्यूलेशन मी दोन मिनीटात केले आता घड्याळ लावा आणि पहा ०८:१७:०० मिनीटांनी आपला पुत्र येतो की नाही घरी ...आता चिंतेला मारा गोळी...थोडा गरम चहा घेतला ... त्यांना म्हटले आपल्या घड्याळात किती वाजले हो बघा...ते म्हटले ०८:१६:५९.....पुढच्या क्षणी त्यांचा मोबाईल खणाणला ...तो त्यांच्या सौं चा होता ...त्या म्हटल्या आपले चिरंजिव सुखरुप घरी परतले आहे म्हणून मी फ़ोन केला....!त्यांनी माझे आभार मानले !
मी मनोमन माझ्या परम श्रध्येय गुरुजी प्रोफ़ेसर कृष्णमुर्तिजींना नमस्कार केला..कारण जे पारंपारिक ज्योतिषशास्त्रात सापडले नाही अशा अनेक प्रश्नांची उकल करुन प्रोफ़ेसर कृष्णमुर्तिजींनी ते सुध्दा किती सहज सिध्दांच्या स्वरुपात लोकांपुढे माडंलेत.