Showing posts with label वैवाहिक जीवन. Show all posts
Showing posts with label वैवाहिक जीवन. Show all posts

Tuesday, June 10, 2008

वैवाहिक जीवनातील गुण मेलन !





वरील कुडंलीवर क्लिक करुन मोठी करुन वाचा.


इंग्रजीत एक अशी सुप्रसिध्द म्हण आहे की Marriages are made in Heaven असे असले तरी सुध्दा लग्न ही पत्रिकेनुसारच जूळवले जातात म्हणुन ज्योतिषाने चांगल्या प्रकारे वधु-वराची पत्रिका मेलन करुनच विवाह जुळ्वणे योग्य होईल. वधु-वर गुण मेलन व वधु-वर पत्रिका मेलन यात फ़ार फ़रक आहे. दोन पत्रिकांमध्ये चांगले गुण मिळालेले असतांना सुध्दा काहींचे घटस्फ़ोट झालेले असतात कारण नुसते ठोकळा कुंडली वरुन गुणमेलन केलेले असते.पत्रिकेमधील ग्रहांचे योग पाहीलेले नसतात.आपल्याकडे परंपरागत गुणमेलन पध्द्त स्विकारली गेली आहे.वधु-वरांच्या जन्म राशी व जन्म राशी नुसार आठ कूटे पाहुन त्यांना गुण दिले जातात.त्यानुसार १८ च्या वर गुण मिळाल्यास पत्रिका विवाहयोग्य ठरविली जाते.परंतु ग्रहमेलना नुसार वधु-वरांच्या जन्मलग्न राशी ह्या परस्परांपासुन २,६,८,१२ या स्थानात नसाव्यात म्हणजेच षडाष्टक किंवा द्विर्द्वादश योग नसावा.
दोघांच्या चंन्द्र राशी सुध्दा एकमेकांपासुन २,६,८,१२ स्थानी नसाव्यात.
वरील बाबतीत लग्नराशी मैत्री व चंद्र राशी मैत्री याला अपवाद आहेत. एकाच ग्रहांच्या राशी षडाष्ट्क योगात किंवा द्विर्द्वादश योगात असतील तर त्यांचे राशी स्वामी एकच असल्यामुळे त्यांच्या स्वभावात व मतात विचार भिन्नता नसते तेव्हा अशा पत्रिका सुध्दा जुळवाव्यात.त्याच प्रमाणे एक नाडी दोष सुध्दा वधु वरांच्या पत्रिके मध्ये असला तर सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
वैवाहिक सौख्य ,संतति सौख्य, कामजीवन ,आरोग्य ,आयूष्य या गोष्टींचा सुध्दा पत्रिकेमध्ये सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.